रयत शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी गुलाबराव टकले यांची निवड
पुणे : मिरवडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव टकले यांची रयत शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. गुलाबराव टकले यांना नुकतेच रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी मार्गी लावणार असल्याचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख टकले यांनी सांगितले.
यावेळी रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. रवीप्रकाश बापूसाहेब देशमुख व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मारुती बापू मगर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुशील शिंदे, कार्याध्यक्ष हेमंत चौधरी, तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल, सुभाष टीकोळे उपस्थित होते.
रयत शेतकरी संघटनेचे कार्य बघता अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात संघटना वाढत आहे. संघटनेत सामील होण्यासाठी मोठ्याप्रमाणावर कार्यकर्त्यांचा कल वाढला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेची भूमिका नेहमीच अग्रेसर राहणार आहे.
– रामदास कोतवाल ( पुणे जिल्हाध्यक्ष, रयत शेतकरी संघटना)